निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. पण प्रचार करताना प्रामुख्याने उमेदवारांनी स्थानिक प्रश्नावर भर देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक आजही नगर शहर हे मोठे खेडे म्हणून संबोधले जाते. ऐतिहासिक शहर असलेल्या शहराची अवहेलना झाली आहे. सध्या नगरमध्ये बेरोजगारी, शिक्षण, रस्ता, पाणी, ड्रेनेज, अतिक्रमण, असे विविध प्रश्न आहेत. उमेदवार प्रचार करताना या प्रश्नावर बोलत नाहीत, तर राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे मांडतात. मतदारांना दररोज ज्या नागरी समस्यांचा, प्रश्नांचा सामना करावा लागतो, त्या समस्या सोडवण्यासाठी भविष्यात काय नियोजन करणार आहोत, यावर प्रचारामध्ये भर देण्याची आवश्यकता आहे. - अॅड.शिवाजी कराळे
स्थानिक प्रश्नांवर भर द्यावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Oct 2019, 5:44 am