नगर : रिमांड होमच्या भिंतीजवळून वाहणारा नाला अर्धवट उघडा आहे. त्यात नागरिक कचर आणून टाकतात. त्यामुळे नाला तुंबला आहे. पावसाळ्यात कचऱ्यामुळे नाला तुंबण्याची शक्यता आहे. त्याचे घाण पाणी रस्त्यावर पसरून नागरिकांनाच त्रास होणार आहे. मात्र, यातून ना नागरिक बोध घेत आहेत, ना कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे हे प्रकार सुरूच आहेत.- दिनेश कुलकर्णी
नाल्यात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 5:30 am