नव्या पेठेत वाहतुकीच्या नियमांचा पालन केले जात नसल्याने सतत वाहतूककोंडी होते. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात. हा रस्ता एकेरी वाहतुकीचा असला तरी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असते. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी तेथे गर्दी होत असल्याने कोंडीत भर पडते. किमान गर्दीच्या वेळी तरी तेथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची गरज आहे.
- अॅड. शिवाजीराव कराळे
- अॅड. शिवाजीराव कराळे