जगातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव लॉकडाउनमुळे कमी जाणवतो हे सांगण्यास तज्ज्ञांची गरज नाही. परंतु याचा अर्थ आपण करोनावर पुर्णपणे मात केलेली नाही. आपल्या जिल्ह्यातील काही तालुक्यात आजही करोनाचे विषाणू पोहोचले नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांनी सहकार्य केल्याने त्यांचे व प्रशासनाचे आभार. आपल्याकडे रूग्ण संख्येत घट होत असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी रुग्ण नसल्याने नियम थोडे शिथील करण्यास हरकत नाही. सकाळ व सायंकाळी निर्बंध घालून काही तासांचा वेळ नागरिकांना द्यावा. परंतु जास्त सवलत देऊ नये. काही नागरिकांकडून त्याचा दुरुपयोग झाल्यावर प्रशासनाने केलेल्या सामुहिक प्रयत्नावर पाणी फिरेल. करोना विषाणूचे रौद्ररूप आपण अनुभवले नसले तरी पाहिलेले आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी लॉकडाउन आवश्यक आहे. - शहाजान शेख....
अजून काही दिवस लॉकडाउन आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2020, 5:30 am