आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, हे साधे तत्व नागरिकांनी स्वीकारल्यास कायदे करण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक बाबींसाठी कायदा करणे शक्य नाही व कायदा करून त्याचा दुरुपयोग होणार नाही, हे सांगणे कठीण आहे. आपल्याकडे थुंकूने, तोंडावर मास्क न लावणे व सुरक्षित वावर न करणे, यासाठी महापालिकेने आदेश काढले. वरील सर्व प्रतिबंधासाठी अतिरिक्त कर्मचारी मनपाकडे आहेत का ? हा खरा प्रश्न आहे. कायदा कोणीही मोडू नये, हे सत्य असले तरी, कारवाई करतानाही भेदभाव होऊ नये, अशी अपेक्षा असते. आज ‘करोना’चे संकट आपल्यावर घोंघावत असताना थुंकूने, मास्क न वापरणे, व सुरक्षित अंतर न ठेवणे यामुळेच विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो व आपल्याबरोबर काहीही चूक नसलेले आपले कुटुंब, आपला परिसर व समाजही बळी पडतो याचे भान कायदा मोडणाऱ्यांनी ठेवावे. सर्वच गोष्टीसाठी कायदा करावा लागतो, याचा अर्थ आपल्यात संवेदनाच शिल्लक राहिली नाही. प्रत्येकाने चांगल्यासवयी आत्मसात केल्यास यासाठी असणारे कर्मचारी महापालिका दुसऱ्या कामासाठी वापरू शकते. - शहाजान शेख.....
चांगल्यासवयी आत्मसात करणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2020, 5:30 am