नगर शहरात उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. परंतु, उड्डाणपुलाचे कामकाजास अजून पूर्ण झालेले नाही. अन्य शहरात एक ते दोन वर्षात उड्डाणपूल बांधले जातात. नगरमध्ये मात्र तसे होत नाही. या शहरातही उड्डाणपुलांची संख्या वाढयला हवी, सध्या मात्र एकही उड्डाणपूल तयार करता आलेला नाही. येथे नेहमीच विकास कामांकडे दुर्लक्ष होताना दिसते. शहरातील विकासकामे सुरू असली तरी ती केव्हा पूर्ण होतील याबाबत सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा कामे रखडल्याचे दिसून येते.
नगरमध्ये उड्डाणपुलाची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2019, 5:45 am