राजकीय पक्षांकडून अनेक नियम मोडले जात असतात, हे वारंवार समोर आले आहे. राजकीय पक्षांचे ऑडिट होते का, त्याबाबत माहिती समोर येत नाही. तसेच पक्षांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता नसल्याचे नेहमीच बोलले जाते. आपल्या देशाचे सरकार हे राजकीय पक्षांकडून चालवले जात असते. त्यामुळे राजकीय पक्षांनी नियम पाळण्याची आवश्यकता असून त्यांनाही माहिती अधिकाराचा कायदा हा लागू होणे गरजेचे आहे.- दिनेश कुलकर्णी
नियम पाळण्याची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2019, 5:44 am