नगर शहरात नेहमीच पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. कधीही नियमीत पाणी सुटत नाही. तशातच पाणीपट्टी वाढविण्याची तयारी सुरू झाली आहे. खरंतर आहे हिच पाणीपट्टी भरपूर आहे. शहराचा विस्तार वाढला असून अनेक उपनगर तयार झाली आहेत. महापालिकेचे कार्यक्षेत्र वाढलेले आहे. सर्व नागरिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. परंतु महापालिकेची सर्वांना पाणी पुरवठा करणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे आता पाणीपट्टी वाढविण्याची गरज नाही. जे लोक कर भरत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करून दंड आकारला पाहिजे. तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल.- अॅड.शिवाजी कराळे
पाणीपट्टी वाढवण्याची गरज नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 5:45 am