वाहतूक विनाअडथळा, विनाअपघात होण्यासाठी वाहतूक शाखेकडून वेगवेगळे प्रयास केले जातात. परंतु नागरिकांच्या सहकार्य अभावी प्रयत्न फोल ठरतात. सिग्नलवर होणारे अपघात रोखण्यासाठी सर्वात प्रथम नागरिकांना झेब्राक्रॉसिंग बाबत माहिती करून देण्याची गरज आहे. अनेक चौकामध्ये झेब्राकॉसिंगचे पट्टेच दिसत नाही. त्यामुळे वाहनचालक सिग्नलवर खुपच पुढे येऊन थांबतात. याशिवाय बऱ्याचवेळा झेब्राक्रॉसिंग दिसत असताना देखील त्याच्या पुढे वाहनचालक येऊन थांबतात, व सिग्नल सुटण्याआधीच वेगाने निघून जातात. सिग्नल लागल्यानंतर वाहनचालक हे झेब्राक्रॉसिंगच्या मागेच कसे थांबतील, यादृष्टीने संबंधित यंत्रणेने जागृती करण्याची आवश्यकता आहे. तसेच बेशिस्त व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. - शहाजान शेख
‘झेब्राक्रॉसिंग’बाबत जागृती करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 5:46 am