नगरबदलत्या काळाची गरज ओळखून एसटी महामंडळ हायटेक होत आहे. डिजिटल इंडियाचा एक भाग म्हणून एसटीनेही आता कॅशलेस पद्धत सुरू केली आहे. तसे फलक बसस्थानकावर लावलेले दिसतात. ही समाधानकारक गोष्ट आहे. मात्र, हायटेक होताना स्वच्छतेच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. एसटी स्टँडवर आजही सर्वत्र कचरा, घाण, अस्वच्छता आढळून येते. स्टँडच्या भिंतीही खराब झाल्या आहेत. हायटेक तंत्रज्ञान स्वीकारताना त्यासाठी आवश्यक असलेले वातावरणही तयार करण्याचा प्रय़त्न महामंडळाने करणे आवश्यक आहे.- दिनेश कुलकर्णी
स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jan 2018, 5:31 am