नगर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीची कामे आता महापालिकेने हाती घेतली आहेत. मात्र, त्यांचे योग्य नियोजन केलेले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे प्रमुख काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता बंद करताना सूचना फलक लावण्यात येत नाहीत. वाहने अडवी लावून काम सुरू केले जाते. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे. शिवाय ही कामे ऐन गर्दीच्यावेळी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याचे नियोजन महापालिकेने पूर्वीच केले असते आणि गर्दीचे दिवस व वेळ टाळून काम केले असते तर सर्वांचीच सोय झाली असती.- दिनेश कुलकर्णी
पूर्व तयारी आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Sep 2017, 5:37 am