नगर : महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या अपे रिक्षा प्रवासी घेण्यासाठी मध्येच उभ्या केल्या जातात. त्यामुळे अन्य वाहनांना अडथळा निर्माण होतो. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अशा ठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी एसटी बसचे थांबे आहेत, तेथे अनेकदा अपे रिक्षा थांबून प्रवासी घेताना दिसतात. यामुळे एसटीच प्रवासी आणि एसटीचालकांनाही त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.- संतोष बनगर
रिक्षांचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2017, 5:35 am