प्रेमदान हडकोशहर स्वच्छतेची जबाबदारी जेवढी महापालिकेची आहे, तेवढीच ती नागरिकांचीही आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या स्पर्धेत नगरला वरचा क्रमांक मिळाला तर त्यात केवळ मनपा प्रशासन किंवा पदाधिकाऱ्यांचाच फायदा होणार असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. मनपाने कचरा संकलित करण्यासाठी कुंड्या ठेवल्या तरीही नागरिक त्यामध्ये कचरा टाकत नाहीत. काही अडचण असेल, कचराकुंडीची जागा बदलायची असेल तर प्रभाग अधिकारी आणि नागरिकांनी संवाद साधून प्रश्न सोडविला पाहिजे. कुंडी असूनही रस्त्यावर कचरा टाकणे, हा यावरील उपाय नाही. - अरविंद मुनगेल
जबाबदारी नागरिकांचीही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2018, 5:38 am