नवीन कचरागाड्यांचे वेळापत्रक सकाळी व्यवस्थित बसलेले दिसत आहे. कचरागाडीमध्येच लोकांनी कचरा टाकला पाहिजे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी साफसफाईचे काम कर्मचारी करताना दिसतात. ही चांगली बाब आहे. मात्र प्लास्टिकबंदी होऊन सुद्धा बाजारात अनेक ठिकाणी ह्याच पिशव्यांचा वापर होताना दिसतो. लोक सुद्धा कापडी पिशव्या घेऊन बाहेर पडत नाहीत. कागदी पिशव्या सुद्धा बहुसंख्येने बाजारात आल्या नाहीत. लोकांनी सरसकट प्लास्टिक पिशवी नाकारली पाहिजे. त्याशिवाय प्लास्टिकबंदी यशस्वी होणार नाही.- दिनेश कुलकर्णी
तर, प्लास्टिकबंदी यशस्वी होईल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 5:45 am