नुकतीच मान्सूनपूर्व पावसाने शहरात हजेरी लावली आणि अपेक्षेप्रमाणेच सर्व आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा या वेळीही पावसाच्या आगमन होताच अपयशी ठरल्याचे दिसून आले. सोमवारी झालेल्या दोन तासाच्या पाऊस वीज यंत्रणेची पुर्णतः दुर्दशा करून गेला. शहरात ठिकठिकाणी वीज वाहक तारा पडल्या आणि वीजपुरवठा पुर्णतः ठप्प झाला. परिणामी नागरिकांना मनस्ताप तर सहन करावा लागलाच, पण त्याबरोबर त्यांची गैरसोयही झाली. तुंबलेली गटारे साफ करण्याकडे महापालिकेने सरळ सरळ दुर्लक्ष केल्यामुळे सर्वत्र पाणी साचले आणि रहिवासी भागात दुर्गंधी पसरली. निदान आता येथून पुढे तरी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यास नागरिकांचे हाल होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. - पूजा नरसाळे....
भविष्यात काळजी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 5:45 am