नगर : भिंगार शहरात अनेक ठिकाणी नळांना तोट्य़ा नाहीत. त्यामुळे पाणी सुटले की नळ सुरू होतात आणि पाणी बंद झाल्यावर बंद होतात. लोकांचे पाणी भरून झाल्यावर अनेक ठिकाणी नळ वाहताना दिसून येतात. भिंगारसाठी खूप दूरवरून पाणी आणण्यात आले आहे. त्यासाठी पैसेही जास्त मोजावे लागत आहेत. तरीही नागरिकांना आणि छावणी परिषदेला पाणी बचतीचे महत्व कळत नाही. खासगी वापराच्या नळांना तोट्या बसविण्याची प्रथम जबाबदारी नागरिकांची असली तरी छावणी परिषदेने यावर लक्ष ठेवून प्रसंगी कारवाई करण्याची गरज आहे.- अरविंद मुनगेल
नळांना तोट्या बसवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2017, 5:37 am