भारत हा युवकाचा देश आहे असे म्हटले जाते. परंतू सर्वात जास्त प्रमाणात युवकच व्यसनाधीन झालेला दिसुन येतो. शाळा आणि कॉलेज बाहेर टपरीवर मावा, गुटका, तंबाखू, विडी, सिगारेट सहजच उपलब्ध होत आहे. एकतर शैक्षणिक संस्था असणारे परिसरात कुठल्याही प्रकारे अशा टपऱ्या टाकायला परवानगी दिली नाही पाहिजे. महापालिका आणि पोलिस प्रशासन यांनी अशा व्यवसायावर कायदेशीर कारवाई करावी. शैक्षणिक संस्था असणारे परिसरात व्यसनाधीन झाल्यामुळे काय परिणाम होतात, त्याचे सुचना फलक लावावेत. परंतु टपरी हटविली तर निश्चितच फरक पडू शकेल. याही पेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली पाहिजे.- अॅड.शिवाजी कराळे
प्रवेशद्वारावर टपऱ्यांना बंदी हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2019, 5:44 am