लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या लोकांना सरसकट पोलिसांनी मारणे चुकीचे आहे. अनेक व्यक्तींची वैद्यकीय कारणे ही खरी निघणार आहेत. कायम डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये असणारी गर्दी पाहता, प्रत्येक घरात कोणत्या तरी आजाराचा किमान एक रुग्ण निघतो. मात्र, नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने जे घराबाहेर येतात, त्यांनी सोशल डिस्टन्स पाळावे. जे विनाकारण फिरतात, त्यांच्यावर कारवाई करावी. गर्दी टाळण्यासाठी धोरण, समयसूचकता, समूह मन ओळखण्याची क्षमता पाहिजे.- दिनेश कुलकर्णी
गर्दी टाळणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 5:45 am