राज्य सरकारने पुढाकार घेऊन प्रत्येक शहरात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाची प्रत्येक महापालिकेला मदत होणार असून कचरा व्यवस्थापन आणि विघटन वेगाने होणार आहे. ह्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत होणे अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने याबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य त्या सूचना देऊन त्याबाबत कृती आराखडा सादर करून त्याप्रमाणे कचरा संकलन प्रक्रिया कायम व्यवस्थित कशी होईल, याबाबत तत्पर राहणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक महापालिकेचे उत्पन्न वाढू शकते. - दिनेश कुलकर्णी
प्रकल्प उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2020, 5:44 am