पुर्वी जंगलात जाऊन पहावे लागणारे प्राणी आता गावात घुसले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात माणूस जखमी किंवा मृत्यू, असे आता अनेकदा ऐकण्यास येत असते. याला कारण ही तशीच आहेत. माणसाने जंगलामध्ये जाऊन सिमेंटची जंगले उभी केली आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांना राहण्यास सुरक्षित जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे असे प्रकार नेहमीच होणार. खरे तर याला माणूस जबाबदार आहे. अनेकदा बिबट्या विहिरीत पडला, असेही प्रकार समोर येत असतात. नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याने माणसावर हल्ला चढवला. आता वनविभागाने या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच बिबट्याचा वावर शहरात होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यामुळे बिबट्या ही वाचेल आणि माणसे देखील वाचतील, हाच याला एकच उपाय आहे.- अॅड.शिवाजी कराळे
वनविभागाने काळजी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2020, 5:45 am