नगर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहे. परंतु येथील पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास होऊन, येथे पर्यटकांची संख्या कशा पद्धतीने वाढू शकते, यादृष्टीने काही योजना राबवता येतील का, याबाबत चर्चा प्रचारांमध्ये होण्याची गरज आहे. याशिवाय बहुतांश शहरांमध्ये एमआयडीसीचा विस्तार झालेला दिसतो. मात्र, नगरमधील एमआयडीसीमध्ये आजही चांगले उद्योग आणता येऊ शकतात. निवडणुकीच्या प्रचारात हे मुद्देही येण्याची गरज आहे. - दिनेश कुलकर्णी
पर्यटन विकासाचा मुद्दा घ्यावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2019, 5:44 am