स्वच्छेतेबाबत लोकांमध्ये अजूनही जागृती होणे आवश्यक आहे. धोकादायक प्लास्टिक निर्माण केले जाणार नाही, किंवा स्थानिक पातळीवर त्याचा वापर केला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स आणि बॅनर लावून प्लास्टिकबंदीबाबत जागृती करण्यात यावी. प्रत्येक वॉर्डात तेथील नगरसेवकाने प्लास्टिकबंदी व्हावी, यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. धार्मिक अणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही प्लास्टिकबंदी बाबत जनजागृती करता येईल का, याचाही विचार व्हावा. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दंड करावा. ‘आपले शहर, सुंदर शहर’ ही भावना निर्माण झाली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने शहर कचरामुक्त व प्लास्टिकमुक्त होऊ शकते. - सुरेश जेजुरकर......
जनजागृतीची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 5:44 am