महापालिकेचा अग्निशमन दल विभागात कमी कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून आहेत. परंतु त्यानंतरही हे कर्मचारी पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य बजावत आहेत. हे दखल घेण्यासारखे आहे. आता प्रशासन आणि लोक प्रतिनिधी यांनी मिळून ह्या विभागात मनुष्यबळ आणि साधन सामग्री कशी वाढवायची याचे नियोजन करणे गरजेचे आहे. स्थायी समितीच्या बैठकीत मागील चार वर्षात हा विषय किती वेळा घेतला गेला ? हा प्रश्नच आहे. सर्व बाजूने उपनगर विस्तार होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक साहित्यासह ह्या दलाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. - दिनेश कुलकर्णी
सक्षमीकरण करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2020, 5:45 am