शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणांना आळा घालण्याचा एक सर्वोत्तम उपाय म्हणजे वैचारिक जागृती करणे आणि राजकिय उदासिनता दूर करणे. अतिक्रमणांवर कारवाई करताना अनेक वेळा होणारा राजकीय हस्तक्षेप कारवाई करण्यावर बाधा आणतो. शहराच्या विकासासाठी, वाहतूक सुरळीत चालण्यासाठी, अपघातांतून होणारा संभाव्य जीविताचा धोका टाळण्यासाठी राजकिय व्यक्तींनी या मध्ये हस्तक्षेप करण्याचे टाळल्यास हा प्रश्न गंभीर रुप धारण करणार नाही. याचबरोबर नागरिकांमध्ये अतिक्रमणामुळे होणाऱ्या गंभीर समस्यांबाबत यथायोग्य रितीने मार्गदर्शन केले तर काहीअंशी सुधारणा पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही व परिणामी ही समस्या सुटण्यास मदत होईल.-राजाराम नरसाळे
राजकिय हस्तक्षेप टाळण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2019, 5:43 am