महाराष्ट्रात अनेक शहरातील सरकारी रुग्णालयात चांगली सेवा मिळते. मात्र, नगरच्या सरकारी रुग्णालयात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी औषोधोपचार वेळेवर मिळत नाहीत. खर तर प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या लोक खासगी दवाखान्यात जास्त प्रमाणात का जातात, याचा विचार करणे गरजेचे आहे. नगरचे जिल्हा रुग्णालय अनेकदा चर्चेचा विषय झालेला आहे. याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना योग्य औषोधोपचार मिळाला पाहिजे. त्यासाठी आरोग्य विभागाने आणि प्रशासन यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. अनेकदा रूग्णालयात रूग्ण कुठेही पडलेले दिसतात. तसेच कर्मचारी सुद्धा सहकाराची भावना ठेवत नाहीत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. - अॅड.शिवाजी कराळे
परिस्थिती बदलण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:45 am