महिलांवरील अत्याचाराच्या घटना नियमितपणे घडत आहेत. या घटना रोखण्याची नितांत आवश्यकता आहे. समाजातील बंधू भाव कमी होत आहे. समाजाची नितीमत्ता ढासळत आहे. कायद्याचा वचकही राहिल्याचे दिसत नाही. अशा घटना घडतात त्यावेळी तत्काळ कडक शासन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने महिलांचा आदर केला पाहिजे. हे महत्वाचे आहे. अत्याचाराच्या घटना रोखायच्या असतील तर कडक उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे.
कडक उपाययोजना करण्याची वेळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2019, 5:44 am