अ‍ॅपशहर

सिग्नलचा गोंधळ

Maharashtra Times 22 Apr 2017, 4:17 pm
एमआयडीसी भागात नागापूरजवळील सिग्नलवर वाहनचालकांचा नेहमीच गोंधळ उडतो. यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची गरज आहे. याशिवाय वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे नियमितपणे पोलिस थांबत नाहीत. वर्दळीचा चौक असल्याने सतत गर्दी असते. अनेक जण नियम मोडून पुढे जातात. त्यामुळे सर्वांनाच त्रास होऊन चौकात कायमच वाहतुकीची कोंडी होत असते. यामध्ये सर्वांचाच वेळ वाया जातो. प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन यावर उपाय करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic signal issue
सिग्नलचा गोंधळ


- के. गोपालकृष्णन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज