दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. परंतु दुभाजक कोणी तोडला, हे सिद्ध कसे होणार, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावत आपली यंत्रणाही सक्षम करण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी ठराविक वेळेत जास्त संख्येने पोलिस रहदारीसाठी लागतात. याचा विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता आहे. दुभाजक तोडण्यापासून ते वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. - दिनेश कुलकर्णी
वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2020, 5:44 am