नगर शहरात म्हशीच्या गोठ्यांना बंदी आहे. मात्र, त्याचे कोणीही पालन करीत नाही. अद्यापही शहरात अनेक ठिकाणी म्हशींचे गोठे आहेत. दररोज बाहेर चारण्यासाठी म्हशी नेल्या आणि आणल्या जातात. त्यावेळी वर्दळीच्या रस्त्याने जाणाऱ्या म्हशी त्रासदायक ठरतात. अनेकदा भररस्त्यात म्हशींची झुंज सुरू होते. वाहतुकीला तर अडथळा होतोच, शिवाय महिला, मुले आणि अन्य नागरिकांचीही यामुळे तारांबळ उडते. याकडे महापालिका किंवा पोलिस यांचे लक्ष नाही. - दिनेश कुलकर्णी
म्हशींचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2017, 5:34 am