नवीपेठशहरातील कापडबाजारात एकेरी वाहतूक आहे. शिवाय तेथे वाहने उभी करण्यासाठी जागा नाही. नवीपेठमध्येही एकेरी वाहतूक आहे. मात्र, येथे बहुतांशवेळा पोलिस नसतात. त्यामुळे कापडबाजारात येणारे नागरिक आपली वाहने नवी पेठेत उभी करून जातात. येथे वाहने उभी करताना शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि पेठेतील नागरिकांना याचा त्रास होतो. वाहने उभी करण्यावरून अनेकदा वादही होतात.- अरविंद मुनगेल
बेशिस्त पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2017, 5:36 am