नगर नगर शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ते दुरूस्ती होत नसल्याने दिवसेंदिवस खड्डे मोठे होत असून त्यांचा त्रास वाढतच आहे. सतत खड्यांतून जावे लागत असल्याने वाहनांचे नुकसान होते. चाके निखळणे, अन्य बिघाड होणे असे प्रकार वाहनांच्या बाबतीत होत आहेत. याशिवाय नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन खड्डे दुरूस्तीचे काम सुरू करावे.- अभिषेक शेटे
खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2017, 5:32 am