भिंगार शहराकडे जाणाऱ्या रस्त्यात भिंगार नाल्याच्या परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. चिकन दुकानातील कचराही येथे टाकला जात असल्याने या भागात कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. सायंकाळच्या वेळी वाहतुकीस या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कुत्रे वाहनांना आडवे जाऊन येथे अपघात होण्याचीही शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2018, 5:40 am