नगरआयुर्वेद हॉस्पिटल कॉर्नरवर रस्त्यावर पाणी साचते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तेथे सोयच नाही. आधीच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यावरच पाण्याचे तळे साचलेले असल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे. केवळ हेच ठिकाण नाही, तर शहरातील बहुतांश रस्त्यांची रचना अशीच सदोष आहे. त्यात जुन्या आणि नव्या रस्त्यांचाही समावेश आहे. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची सोयच नाही. शिवाय अतिक्रमणे झाल्याने पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.- दिनेश कुलकर्णी
आयुर्वेद कॉर्नरवर रस्त्यावर पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2017, 5:32 am