लॉकडाउनचा काळ सुसह्य होण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित मिळून काम करणे गरजेचे आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच सरकारने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळायला पाहिजे. याकाळात नागरिक उपाशी राहणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. पहिल्या सारख्याच अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू रहाव्यात. परंतु नागरिक गर्दी करणार नाहीत, याची काळजी घेऊन अत्यावश्यक सेवा कोणत्या वेळी उपलब्ध होतील, हे जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन यांनी जाहीर केले तर नागरिक गडबडून जाणार नाही. आता सध्या नागरिकांनी विनाकारण किराणा व इतर वस्तू भरून ठेवल्या आहेत. हातावर पोट असणारे लोकांचा नक्की प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकडे सरकारने काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते. नागरिकांनी पुन्हा तीन मे पर्यंत घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. - अॅड.शिवाजी कराळे
एकत्रित काम करणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2020, 5:30 am