नगरशहरातील रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या केलेल्या दुचाकी उचलून नेऊन कारवाई करण्यासाठी पोलिसांतर्फे क्रेनवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहने उचलून नेत असताना हे कर्मचारी उघड्या वाहनातून धोकादायक पद्धतीने प्रवास करतात. आधीच रस्त्यावर खड्डे असल्याने वाहने हेलकावे खातात. अशावेळी या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करण्याची गरज आहे. वाहतूक पोलिस आणि कंत्राटदार कंपनीने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.- अल्ताफ शेख
यांच्या सुरक्षेचे काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2017, 5:35 am