असे अपघात कधी थांबणारनगर-शहरातून जाणाऱ्या स्टेशन रोडवर दुभाजकाला वाहनांची धडक बसण्याचे प्रकार सतत घडतात. या रस्त्यावर दुभाजक आहे, गतिरोधक आहे. मात्र, त्यांचे सूचनाफलक नाही. लक्षात येईल अशी दक्षता घेण्यात आलेली नाही. फलक लावले तरी ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे अपघात सुरूच आहेत. विशेषतः रात्री आणि नवीन वाहनांच्या बाबतीत हे प्रकार वारंवार घडतात. बांधकाम विभागाने याची दखल घेऊन योग्य ती दक्षता घेण्याचे आणि ती कायमस्वरूपी राहील, याची काळजी घेण्याची गरज आहे.-ज्ञानेश्वर कर्डिले
असे अपघात कधी थांबणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2017, 5:37 am