दिल्ली गेट ते अप्पु हत्ती चौक हा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्ताचा काही भाग हा सिमेंट काँक्रिटचा होत आहे. पण या रस्त्याचे काम करीत असताना त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे काढण्याची गरज आहे. याशिवाय रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ते मध्येच बंद पडते, असे वारंवार शहरामध्ये घडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मध्येच बंद पडणार नाही, त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारा निधी मिळणे आवश्यक आहे. अन्यथा निधीअभावी काम रखडले जाऊ शकते. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ते राजकीय हस्तक्षेप करून बंद पाडू नये.- अॅड.शिवाजी कराळे
निधीअभावी काम रखडू नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2019, 5:45 am