अ‍ॅपशहर

फडणवीस म्हणाले, औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता?, आता उद्धव ठाकरेंकडून एका वाक्यात प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या नामांतरावरुन आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीनगर नामांतरावरुन सेनेवर टीका केली होती. त्यांनाही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 25 Jan 2022, 10:14 pm
औरंगाबाद : शहरातल्या पहिलं नाट्यगृह संत एकनाथ रंगमंदिराचं नुतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधताना ठाकरे यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या नामांतरावरून आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीनगर नामांतरावरुन सेनेवर टीका केली होती, त्यांनाही प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadanvis And uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे


यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, टाळ्या वाजवून मतं मिळवून घ्यायची आणि मग त्या वचनाकडे पाठ फिरवायची, हे शिवसेनेच्या संस्कृतीतील बसत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला हे शिकवलं नाही. 'संभाजीनगर' नावाचा प्रश्न आहेच. तर येथील विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे करण्याचा ठराव विधानसभेने मंजूर केला व केंद्र सरकारच्या मंजूरीसाठी तो पाठवला आहे. मात्र हा ठराव मंजूर करण्याची आठवण केंद्र सरकारला करुन द्यावी लागेल असे म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला चिमटा घेतला.

तर पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेने संभाजीनगरकरांना आतापर्यंत दिलेली अनेक वचन पूर्ण केली आहे. त्यामुळे संभाजीनगरकरांनी महानगरपालिकेवरील भगवा खाली उतरू दिला नाही आणि उतरुही देणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. संभाजीनगरकरांच्या चरणी जी काही आम्ही सेवा करतो आहोत, त्याच्यामध्ये एक नाट्यगृहाच लोकार्पण होत आहे. त्यामुळे नूतनीकरण केल्यानंतर संभाजीनगरकरांना सुद्धा आनंदाचा एक ठेवा मिळेल असेही,मुख्यमंत्री म्हणाले.

औरंगाबादचं संभाजीनगर करणं झालं नाही, कसल्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता? - फडणवीस

तुमच्याकडून साधं औरंगाबादचं संभाजीनगर करणं झालं नाही. उस्मानाबादचं धाराशिव करणं झालं नाही. कसल्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता... दुसरीकडे भाजपने उत्तर प्रदेशात अलाहाबादचे प्रयागराज करुनही दाखवलं. आम्ही करुन दाखवलं तुम्ही फक्त बोलतच राहिला. हिंदुत्व हे जगावं लागतं आणि मोदींनी ते करून दाखवले, अशी सडकून टीका काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज