कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहा हे आपण पाहतच आहोत.कालतर एकाच दिवशी दोन आकडी संख्या शहराने गाठली.जागतिक आरोग्य संघटनेने पुढील पंधरा दिवस याबाबतीत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.यापुढे केंद्र व राज्य सरकारतर्फेच घेतलेले निर्णय बंधनकारक आहेत.अशा परिस्थितीत नाशिक ,इचलकरंजी इ.ठिकाणी दुकानदारांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवणेसंबंधी निर्णय घेतला आहे.तसाच निर्णय आपण घ्यावा व जनतेनेही गांभिर्याने यापुढे विनाकारण घराबाहेर जाणे टाळावे.तर आणि तरच रूग्णसंख्या आटोक्यात येऊ शकेल.कंपन्यांमध्ये मास्क,सुरक्षित अंतर पाळणे कठीण होत आहे असं वाळूज वसाहतीतील घटणेवरून वाटते ...शरद लासूरकर औरंगाबाद
कोरोना विषाणू संसर्ग ....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 5:30 am