शहर वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे सत्र संपता संपता संपेना. हर्सूल टी पॉइंट येथून काळी पिवळी टॅक्सी व मालाची वाहतूक करणाऱ्या मेटॅडोर म्हणून प्रवाशांची अशी कोंबाकोंबी चाललेली असते. निर्धारित आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून असा धोकादायक प्रवास वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असतो. ही धोकादायक वाहतूक थांबून सुरक्षित प्रवास करण्यासंदर्भात उदबोधन करण्यात यावे असे मत व्यक्त होत आहे. श्री रवींद्र तायडे
शहरातून धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2019, 5:40 am