शहरातील रोशन गेट ते आझाद चौक या रोडवरील सर्व पथदिवे दिनांक सात जानेवारी 2020 रोजी रात्रंदिवस सुरू असल्याचे आढळले पथदिवे दिवसा बंद असणे अपेक्षित आहे परंतु ते दिवस-रात्र सुरू राहतात अशी नागरिकांची तक्रार आहे. शासन एकीकडे वीज बचतीचा संदेश देत असताना दुसरीकडे मात्र विजेची अशी नासाडी होत असल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली.या भागातील पथदिवे सकाळी बंद फक्त रात्रीच सुरु ठेवावेत अशी मागणी आरिफ शेख, मुख्तार शेख, जिया पठाण, अत्तर शेख, मुसा शेख, शफीक पठाण, अकबर पठाण, नबील शेख आदींनी केलेली आहे. रवींद्र तायडे
पथदिवे दिवसाही सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2020, 5:45 am