नगर : पंढरपूरकडे निघालेल्या पालख्या-दिंड्या सध्या नगर शहरातून जात आहेत. अशावेळी वाहतूक पोलिसांची मोठी जबाबदारी असते. त्यांनी दिंड्यासाठी रस्ता मोकळा करताना वाहतुकीचे योग्य नियोजन करायला हवे. दिंडी जात असलेल्या मार्गावरील जड वाहतूक तात्पुरती थांबविणे किंवा अन्य रस्त्याने वळविण्याचा उपाय करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने दिंडी मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिक आणि वारकऱ्यांनाही त्रास होत आहे.-अड. शिवाजीराव कराळे
दिंड्याचे योग्य नियोजन हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2017, 5:31 am