एकेकाळीआशिया खंडात वेगाने वाढलेली उद्योग नगरी,पर्यटनाची राजधानी, अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एलोरा अजिंठा सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठवाड्याची राजधानी म्हणून नावलौकिका स साजेसे वलय असलेल्या नगरीत,खड्यांनी थैमान घालावे,यापेक्षा वाईट ते काय असावे।'स्मार्ट सिटी' च्या वैभवशाली थाटाने मिरवणाऱ्या शहरांतील रस्ते उखडून का जातात। कोट्यावधी रुपयाचा खर्च करून जर ठिगळ जोड़ावे लागत असेल तर कुठं तरी पाणी मुरतेय,हे नक्की।कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्ते का उखडून जातात? याचाच अर्थ असा की,रस्ते बांधणी अशास्त्रीय पद्धतीने केली जात आहे। त्याचवेळी पडलेले खड्डे बुजवतांना डांबरीकरण योग्य होत नाही।विचारणार कोण? बऱ्याच वेळा मुरूम टाकून खड्डे बुजवल्याने ते एकाच पावसात वाहून जातात।मग,त्यावर खर्च कशासाठी? अशास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजवणे वा रस्ते बांधणी होत असते तेंव्हा महानगर पालिकेची यंत्रणा कुठे तरी पेंड खातेय,हे नक्की। मनपा अस्तित्वात येऊन चार दशकांचा काळ लोटला पण,शहराच्या विकासाला अंकुर फुटला नाही।मर्चडीस कारचे शहर म्हणून ओळख पटली।पण,शहराचा विकास मात्र 'अर्थ'पूर्ण सहभागामुळे अवरुद्ध झाला। सिमेंट चे रस्ते एकमेव उपाय असला तरी त्यासाठी कुणीही आग्रही नाही।का? खराब रस्त्याबाबत कंत्राटदारास जबाबदार धरून,त्याच्याकडून संपूर्ण खर्च व्याजासह वसूल करावा। तसेच मला वाटते की,खासगीकरणाबद्दल केंद्र सरकार फारच आग्रही आहे।तेंव्हा राज्यातील सर्वच पालिका व महानगर पालिका बरखास्त करून,एखाद्या तेजस्वी उद्योगपती कडे सोपवून सरकारने कार्यमुक्त व्हावे। एक प्रयोग असाही करून बघायला कुणाची का हरकत असेल?डॉ. नूतनकुमार सी.पाटणी,औरंगाबाद
विकास हवा,भ्रष्टाचार नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2020, 5:30 am