शहरातील उरलेसुरले नालेली नामशेष होण्याच्या मार्गावर दिसतात कारण नाल्यांवर टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. नाल्याची संपूर्ण साफसफाई त्यातील गाळ, प्लास्टिक काढण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असली तरी नाल्यांवर ज्या इमारती मोठ्या दिमाखात उभ्या आहेत त्या इमारती खालील नाल्यांची सफाई संबंधित इमारत मालकांनी करायला मुळीच हरकत नाही. तेवढ्या जागेचा उपभोग संबंधित इमारत मालक वर्षानुवर्षे घेत असतो त्यामुळे ती त्यांची नैतिक जबाबदारी ठरते.त्यासाठी मान्सून पूर्व कामाचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने संबंधित इमारत मालकांना नोटीस बजावणे गरजेचे आहे भविष्यात काही मोठी आपत्ती ओढवल्यास त्यास संबंधितास जबाबदार धरण्यासाठी मनपाने स्वहित बाजूला ठेवून त्यांना तातडीने नोटीस देऊन इमारतीखालील नाल्याच्या साफसफाईकडे त्याच्या अंमलबजावणीकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.श्री रवींद्र तायडे
मनपाने चालढकल करू नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2019, 5:41 am