नाट्यप्रेमी व शहर रसिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि शहराचे भूषण असणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहांची दूरवस्था सुरू आहे. नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच कचऱ्याचा मोठा ढीग बघायला मिळतो तेथून सतत दुर्गंधी येत असते. नाट्यगृहाच्या सभोवताली वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने ठीक ठिकाणी कचरा इतस्तत विखुरले दिसतो. खानावळीच्या थर्माकोलच्या युज अँड थ्रो डिशेस विखुरलेल्या अवस्थेत बघायला मिळाल्या कानाकोपऱ्यात कचऱ्याची गाठोडी भरलेली आढळली. नाट्यगृहाच्या दर्शनी भागाते शोभेसाठी कारंज बसविण्यात आली,े बंद पडून नादुरुस्त झालेले आहेत.येथील खाद्यपदार्थांचे भावी नेहमीच दामदुप्पट असतात. ध्वनीयंत्रणाही सदोष आहे पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाही त्यामुळे रसिकांना या नाट्यगृहात येणे म्हणजे एक शिक्षा वाटत आहे. वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली आहे श्री रवींद्र तायडे
नाट्यमंदिराची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2019, 5:32 am