या लॉकडाऊनच्या काळात अनेक किराणा दुकाने , व्यापारी दुकाने तसेच इतर व्यावसायिक दुकाने सुद्धा बंदच असल्यामुळे आधी जो कचरा रस्त्यावर ,नाल्यांमध्ये फेकला जात होता त्याचे प्रमाण बरेच कमी झालेले दिसत आहे.म्हणून या कालावधीत मनपाने नालेसफाईची कामे लवकर पूर्ण करावीत.पावसाळा सुरू होताच अनेक इतर आजारही डोके वर काढतील आधीच आपण कोरोना मुळे चिंतेत आहोत.तसेच नेहमीच्या रहदारीचे कारण सांगून रस्तेदुरूस्तीची,खड्डे बुजविण्याची कामे टाळली जात होती व अपघात वाढले होते.आता अनायासेच लॉकडाऊन मुळे रस्ते मोकळे राहतात त्यामुळे रस्तादुरूस्तीची कामेही या कालावधीत मनपाने पूर्ण करावीत.लॉकडाऊनमध्ये ही संधी साधून मनपाने लवकरात लवकर वरील कामे पूर्ण करून पावसाळ्यातील आजारांचा उद्रेक व अपघात व खड्डे समस्या, सोडवावी....शरद लासूरकर औरंगाबाद
लॉकडाऊन काळात मनपाने ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2020, 5:30 am