हे छायाचित्र आहे गरवारे मार्गांवरील ! बसेस,ट्रक्स जवळून जाताच अशाप्रकारे धूळ उडते आणि पायी चालणार्यांना,ईतर वाहनचालकांना पुढील रस्ता दिसतच नाही.शिवाय नाका ,डोळ्यात धूळ जाते.मनपाकडून नुसतीच रेती पसरल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.शहरांमध्ये ईतर आजारांबरोबरच या धुळीमुळे सुद्धा श्वसन विकार व दृष्टी विकार वाढत आहेत ते तज्ञ डाँक्टरांनी सांगूनही उपाययोजनांबाबत मनपाकडून हालचाल दिसत नाही.वरीलविषयी त्वरीत कारवाईची अपेक्षा जनतेस आहे.....शरद लासूरकर सिडको औरंगाबाद-
रस्त्त्यावर धुळीचे साम्राज्य ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2019, 5:43 am