शिक्षण व इतर पदविका घेऊनही नोकरी लागत नसल्याने सुशिक्षित तरुणाईच्या मनात प्रचंड खदखदत आहे आता हेच बघा ना! हे गंगाराम जाधव नावाचे गृहस्थ,सुशिक्षित आणि शिक्षण पदविका प्राप्त करूनही नोकरी लागत नसल्याने केवळ डोनेशन अभावी नोकरी न मिळाल्याने शेवटी बूट पॉलिशच्या धंद्याकडे वळले आहेत यावरून देशांमध्ये बेकारीची तीव्रता किती मोठी आहे हे विदारक सत्य समाजासमोर यानिमित्ताने आले आहे देशातील पदवीधर उच्च पदवीधर विविध पदवीत पदविकाधारक तरुण तरुणी बेकारीचे जीवन जगत आहेत काही तर चक्क पाणीपुरी विकत आहेत काही इतर मिळेल ते काम करीत आहेत या देशातील वाढलेली बेकारी अखेर संपणार तरी कधी असा प्रश्न सुशिक्षित तरुण तरुणी विचारीत आहेत.रवींद्र तायडे
बेकारीची अशीही दाहकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2018, 5:34 am