132 के.व्ही.हर्सूल उपकेंद्रातून निघणार्या 33के.व्ही.वीजवाहिनी भूमीगत करण्यासाठी नाली खोदण्याचे काम 20 मे पासून हाती घेण्यात आले.3/4 दिवसात काम पूर्ण करू म्हणून सांगण्यात आले.मात्र आज महिना उलटूनसुद्धा नालीखोदाईचे काम सुरूच आहे.महिनाभरापासून सर्व रहिवाशांची तसेच वाहनधारकांची कुचंबणा होत आहे.अनेकठिकाणी नळजोडणी कट झाल्याने जनता त्रस्त आहे.लवकरात लवकर केबल्स टाकून वीजवितरण अधिकारी या समस्येपासून जनतेची,वाहनचालकांची कोंडी सोडवतील काय ? महिनोंमहिने अशा इमर्जन्सी कामास वेळ न देणे हे कशाचे द्योतक मानायचे ? शरद लासूरकर सिडको औरंगाबाद-
केबलसाठी नाली खोदणे महिनाभरापासून सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 5:41 am