हे छायाचित्र आहे उस्मानपुरामधील ललित कला भवन ,कामगार कल्याण केंद्र औरंगाबाद- या नाट्यगृहाचे ! ३/४ वर्षांनंतर येथे स्पर्धा या वर्षी आयोजित करण्यात आल्या, या आधीचे रूप आणि आताची परिस्थिती यातील फरक स्पष्ट दिसत आहे.आता स्वच्छ परिसर,सुंदरसं व्यासपीठ ,नविन पडदा,खुर्च्या सगळृ कसं उल्हसीत वातावरणात निर्मितीसाठी योग्य वातावरण तयार झालेले दिसत आहे.मनपाकडून शहरातील इतर नाट्यगृहांची झालेली दैना पाहता हे नाट्यगृह खूपच छान तयार केलेय.यापुढील सांस्कृतिक कार्यक्रम येथे घेणे उचित राहील असे वाटते.शहरातील रसिकवृंदांच्या अपेक्षा व सद्यस्थिती बघता नाट्यरसिकही या मताशी सहमत होतील असे वाटते.जर कामगार कल्याण केंद्र हे करु शकते तर मनपा का नाही ? असा सवालही जनता करीत आहे.अभिनंदन का.क.कें.चे...शरद लासूरकर सिडको औरंगाबाद-
ललित कला भवन ,उस्मानपुरा ..कात टाकली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2019, 5:44 am